नैसर्गिक आपत्तीपोटी जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आलेल्या अनुदानावर ४० कोटींचा डल्ला मारणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.यापूर्वी १० तलाठ्यांना निलंबित करण्यात आले होते.यात गुरुवार दि.१९ रोजी आणखीन ११ अधिकारी, कर्मचाऱ्यांची भर पडली आहे.आतापर्यंत २१ जण निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये ७ ग्राम महसूल अधिकारी आणि तहसील कार्यालयातील ४कारकून यांचा समावेश आहे.
दरम्यान या घोटाळ्यातील १० तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवार,१३ जून रोजी सायंकाळी उशिरा तडकाफडकी निलंबित केले होते. या तलाठ्यांनी तब्बल १ कोटींहून अधिक अनुदान हडपल्याचे चौकशीत उघड झाले आहे. दरम्यान अनुदान लाटणाऱ्यात दोषी असलेल्या इतर तलाठी,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक यांच्यावर देखील निलंबनाची टांगती तलवार आहे.