मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी विज्ञान प्रदर्शन अतिशय महत्वाचे - डॉ.शेफाली भुजबळ

मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी विज्ञान प्रदर्शन अतिशय महत्वाचे - डॉ.शेफाली भुजबळ
  • MG News
  • जानेवारी 9 2025

Share on  

 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विविध सुप्त गुण असतात ते सुप्त गुण बाहेर येण्यासाठी विज्ञान प्रदर्शन अतिशय महत्वपूर्ण ठरतात. विज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती व सृजनशिलतेचा विकास होत असतो. देशाचे भवितव्य घडवणारे ग्रामीण भागातील बालवैज्ञानिक अशाच प्रदर्शनातून पुढे येथील असा विश्वास मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांनी व्यक्त केला.

श्री.खंडूमामा शेलार बहूउद्देशीय ग्रामविकास संस्था विखरणी संचलित, लक्ष्मी पब्लिक स्कूल विखरणी ता. येवला जि. नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग येवला आणि तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५२ वे येवला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२४-२५ पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभ डॉ.शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत  आज पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.


यावेळी गटविकास अधिकारी संदीप वायाळ, सरपंच सौ.ज्योती शेलार, प्राचार्य डॉ.अनिल कोकाटे,आत्मा मलिक संस्थेचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे, प्रा.मंगेश निकम, मकरंद सोनवणे, आयोजक मोहन शेलार, प्रा.ज्ञानेश्वर दराडे,हभप श्रावण महाराज वाघमोडे,एल.जी.कदम,बाळासाहेब लोखंडे, मच्छिंद्र थोरात,हणमंत काळे, तुषार कापसे, संतोष खैरनार,गटशिक्षण अधिकारी संजय कुसाळकर, विस्तार अधिकारी मनीषा वाकचौरे,रवींद्र शेलारविस्तार अधिकारी श्री.मुंढे, श्री. दहिफळे, मुख्याध्यापिका वनिता गायकवाड, केंद्र प्रमुख राजेंद्र कुशारे, चंद्रशेखर दंडगव्हाळ, रमेश उगले, अरुण खरोटे, निलेश जाधव, शशिकांत पानगव्हाणे, नानासाहेब गोराने, निरीक्षक किरण पगार, राम जाधव, यमाजी शेलार, अरुण ठोंबरे, नामदेव पगार, , गोरख आहिरे, योगेश उशीर, अंबादास पगार, राजेंद्र शेलार, सोपान पगार, संदीप महाजन, संतोष आवारे,राहुल कदम, शरद आहीरे, अमोल दुकळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


यावेळी डॉ.शेफाली भुजबळ म्हणाल्या की, गेली २० वर्षांहून अधिक काळापासून आपली येवल्याशी नाळ जोडली आहे. येवला हे आपल्यासाठी कुटुंब असल्याचे सांगत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्यासह संतांनी आपल्या साहित्यातून मोठं ज्ञान उपलब्ध करून दिले आहे. या संतांचे विचार आजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक असून विज्ञानाला अध्यात्माची जोड देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.


त्या पुढे म्हणाल्या की, शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र असे बदल झाले आहे. त्यामुळे मुलांचे भविष्य घडविण्यासाठी त्यांना नावीन्यपूर्ण शिक्षणाची जोड देण्याची आवश्यकता आहे. त्यातून विद्यार्थी कला कौशल्य मिळवत आपली वाटचाल करू शकतील. विज्ञान आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे योगदान देते, आपल्या देशात अनेक महान शास्त्रज्ञ होऊन गेलेत. या महान शास्त्रज्ञांच्या योगदानामुळेच आज भारताने जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी तयार केलेल्या साहित्याचे वाचन विद्यार्थ्यांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.


यावेळी प्राचार्य प्रा.डॉ.अनिल कोकाटे, आत्मा मलिक संस्थेचे अध्यक्ष हणमंत भोंगळे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, गटशिक्षण अधिकारी संजय कुसाळकर, निरीक्षक किरण पगार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मोहन शेलार यांनी तर सूत्रसंचालन प्रा.किरण ठाकरे केले.

संबंधित बातम्या