पानशेत परिसरात वास्तव्यास असलेल्या रोहिदास काळूराम काटकर याच्या खुनाच्या आरोपातून वेल्हे पोलिसांनी परभणीच्या पाच जणांना अटक केली आहे आकाश सुभाष भिसे, आकाश सुभाष भिसे,रितेश उत्तम जोगदंड, रमेश रामभाऊ शेळके पांडुरंग भानुदास सोनवणे अशी अटक केलेल्या आरोपींची असून आरोपी पानशेत परिसरात फिरायला गेले असता अगदी किरकोळ कारणावरून त्यांच्या रोहिदास याच्याशी वाद झाला .या वादातून त्यांनी सर्वांनी मिळून त्याला मारहाण केली आणि एकाने तर त्याच्या छातीवर दगड मारला. यामध्ये रोहिदास काटकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला घटनांतर आरोपी पसार झाले होते मात्र पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीय गुन्हे शाखा आणि वेल्हा पोलीस ठाण्याच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करून सर्व आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे पानशेत परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पर्यटनस्थळांवरील शिस्त आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.