आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ  आमदार हिरामण खोसकर संतापले

आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ  आमदार हिरामण खोसकर संतापले
  • MG News
  • जानेवारी 10 2025

Share on  

आदिवासी विभागाच्या वतीने अन्नपूर्णा सेंट्रल किचन ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. मात्र ही सुविधा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याची सुविधा आहे असाच प्रकार नाशिक जिल्ह्यात असलेल्या ४४ आश्रमशाळेत घडतं आहे रोजच मरण असच या ४४ शाळेतील १८ हजार आदिवासी विद्यार्थी अनुभवत आहे इगतपुरी तालुक्यात असलेल्या सेंट्रल किचन मध्ये जणांवरे खाणार नाही असा पोषण आहार १८ हजार विद्यार्थी खात आहे बाजारात व्यापारी घेत नसलेला दोन नंबर चा भाजीपाला थेट इथे वापरला जातं आहे. विशेष म्हणजे सेंट्रल किचन मध्ये जर बघितलं तर इतकी दुर्गधी आणि अस्वचतेचे साम्राज्य या ठिकानी आज बघायला मिळालं आहे.

अठरा हजार विद्यार्थी ४४ आश्रमशाळा आणि निकृष्ट अन्न देण्याचं काम इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव आश्रमशाळेतील अन्नपूर्णा किचन कडून होत आहे. दि ९ रोजी आमदार हिरामन खोसकर यांची अचानक भेट अन भेटीत उघड झाला काळाबाजार...
आदिवासी विकास विभागाकडुन तथा शासनाच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात मात्र सबंधित विभाग तथा अन्नपूर्णा किचन सेंटर कडून अठरा हजार विद्यार्थ्यांना निकृष्ट प्रकरचा अन्न पुरविले जातं असल्याचा प्रकार आज डोळ्यासमोर उघडकीस झाला आहे. 
अक्षरशः जिल्ह्यातील ४४ शाळेतील विद्यार्थांना सडलेला भाजीपाला व जणांवरे खाणार नाही असे कडधान्य पुरविले जात आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अर्धवट भाजलेल्या चपत्या देखील पुरविल्या जातात दरम्यान आज आमदार हिरामन खोसकर यांनी सकाळी ९ वाजता भेट दिली त्या प्रसंगी सर्व प्रकार उघडकीस झाला आहे. 
जनावरे देखील तोंड लावणार नाहीत असे निकृष्ट दर्जाचे जेवण येथील शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहातील आदिवासी मुला-मुलींना दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक जिल्ह्यात अतिदुर्गम भागात असलेल्या या आश्रमशाळेच्या वसतिगृहात एकूण १८ हजार विद्यार्थी राहत असून  रोजच्या आहारामध्ये वापरली जाणारी हरभरा, वाटाणा व चवळी ही कडधान्ये किडलेली, बुरशीयुक्त असल्याचे समोर आले आहे. या कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात किडे आढळून आले. किड्यांनी पोखरलेली ही कडधान्ये विद्यार्थ्यांना खायला दिली जात आहेत. तांदळाचा दर्जा देखील चांगला नाही. वसतिगृहात वरण बनवण्यासाठी वापरली जाणारी मूग डाळही भेसळयुक्त आहे. चपात्यांसाठी वापरले जाणारे पीठ निकृष्ट गव्हाचे आहे. मात्र, उपाशी राहण्यापेक्षा नाईलाजाने हे अन्न खाण्यावाचून येथील विद्यार्थ्यांसमोर पर्याय नाही. गरिबीशी संघर्ष करणाऱ्या या आदिवासी मुलांना खराब अन्न देऊन त्यांची कुचेष्टा करण्याचाच हा प्रकार आहे. दरम्यान यावेळी सेंट्रल किचनचे अधीक्षक महेंद्र सपकाळ व कैलास चव्हाण हे देखील उपस्थित होते. आमदार हिरामण खोसकर यांनी सबंधित दोषी अधिकारी यांना नीलनबीत करण्यात येईल असे सांगितले.


---------------------------------------
- स्वयंपाकासाठी कर्मचारी असूनही अन्नपूर्ण किचन सेंट्रल मध्ये मशीन द्वारे चपत्या दिल्या जातात 
- दरम्यान चपट्या एकाचं बाजूने भाजल्या जातात एका बाजूनं कच्चा असतात 
- स्वयंपाकाच्या खोलीत अस्वच्छता. धान्य व स्वयंपाकाचे            साहित्य ठेवलेल्या ठिकाणी अस्वछता 
- टेस्टिंग लॅब ला बारा ही महिने लॉक 
- दोन दिवस अगोदर टोमॅटो कापून ठेवतात 
- फळे कधी जातं नाही, सडलेला बटाटा, कीड लागलेली डाळ, निकृष्ट चिकी, बदला असलेला भाजीपाला- 
-------
कंत्राटी कामगार यांनी सत्यात आणली समोर, 
नदी तुन टँकर चे पाणी प्यायला आणले जातं असून गेल्या तीन महिन्यापासून फिल्टर बंदच आहे तर किचन मधले भांडे पूर्ण पणे चिरलेले असून  मुलांना चपाती डब्यात न देता प्लास्टिक पिशवीत दिली जाते त्यामुळे चपातीला पूर्णपणे घाम येईन खराब होत आहे विशेष म्हणजे 100 किलोमीटर लांब असलेल्या आश्रमशाळेना हा पुरवठा होत आहे. 
-----------
- स्वयंपाकासाठी कर्मचारी असूनही अन्नपूर्ण किचन सेंट्रल मध्ये मशीन द्वारे चपत्या दिल्या जातात 
- दरम्यान चपट्या एकाचं बाजूने भाजल्या जातात एका बाजूनं कच्चा असतात 
- स्वयंपाकाच्या खोलीत अस्वच्छता. धान्य व स्वयंपाकाचे            साहित्य ठेवलेल्या ठिकाणी अस्वछता 
- टेस्टिंग लॅब ला बारा ही महिने लॉक 
- दोन दिवस अगोदर टोमॅटो कापून ठेवतात 
- फळे कधी जातं नाही, सडलेला बटाटा, कीड लागलेली डाळ, निकृष्ट चिकी, बदला असलेला भाजीपाला- 
-------
कंत्राटी कामगार यांनी सत्यात आणली समोर, 
नदी तुन टँकर चे पाणी प्यायला आणले जातं असून गेल्या तीन महिन्यापासून फिल्टर बंदच आहे तर किचन मधले भांडे पूर्ण पणे चिरलेले असून  मुलांना चपाती डब्यात न देता प्लास्टिक पिशवीत दिली जाते त्यामुळे चपातीला पूर्णपणे घाम येईन खराब होत आहे विशेष म्हणजे 100 किलोमीटर लांब असलेल्या आश्रमशाळेना हा पुरवठा होत आहे. 
-----------
व्यापाऱ्यांनी नाकारलेला माल पोषण आहारासाठी 
---
विद्यार्थी आश्रमशाळा त्र्यंबकेश्वर 
इगतपुरी तालुक्यातून अन्नपूर्णा किचन सेंट्रल कडून जो काही पोषण आहार आम्हाला दिला जातो तो अत्यन्त बेचव आणि निकृष्ट प्रकरचा दिला जातो मात्र तक्रार करावी तरी कोणाकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-----
 विद्यार्थ्यांना सुदृढ आर म्हणून फळांचा विचार केला जातो मात्र या ठिकाणी कुठल्याच शाळेला फळे दिले जात नाही त्यामुळे फळे मिळतात की नाही असा प्रश्न अधीक्षक चव्हाण यांना विचारला असता त्यांनी सरळ भाषेत सांगितलं का अजून काही फळे आलेली नाही त्यामुळे आम्ही फळे मात्र शासनाकडून फळे दिले जात आहे अशी माहिती येथील काही ग्रामस्थ सांगत होते.
-----

संबंधित बातम्या