नितेश राणे यांनी केलेल्या मुस्लिम लोकांकडून मटण खरेदी न करता हिंदू लोकांकडून करा असे वक्तव्य केलं होते त्याला खा.उदयनराजे भोसले यांनी त्यांचा शैलीत उत्तर दिलं आहे. मी नितेश राणे यांचं वक्तव्य ऐकले नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव ही संकल्पना होती. जर तसा भेदभाव केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो. हिंदू मुस्लिम असा कधी भेदभाव केला नाही. नितेश राणेंना असं म्हणायचे असेल औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालले आहे ते खोदून काढा असं तर मी किती वेळा तरी सांगितलं आहे. तो आक्रमण करायला आला होता. शिवाजी महाराज आणि आपले पूर्वज नसते तर आपण अजून देखील गुलामगिरीत असतो हे विसरू नका त्याचे त्याचा अर्थ तसा काढू नका. मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे ज्यांना खायचे आहे त्यांनी खावं असा टोला देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे.
BYTE - उदयनराजे भोसले, खासदार