महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांनी मोर्चे बांधणीची तयारी सुरू केली आहे. बृहन्मुंबईमध्ये पॅनल पद्धत नाही. तर इतर महापालिकेत पॅनल पद्धतीत निवडणूक का घेत आहेत? असा प्रश्न आता राजकीय पक्षांकडून उपस्थित केला जात आहे. याच मुद्यावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आमच्यावर हा अन्याय का करताय? असे म्हणत पॅनल पद्धतीला विरोध दर्शवला जात आहे. या पद्धतीने नव्या रचनेत 50 हजार मतदारांचा एक प्रभाग असेल, तर 4 नगरसेवकांचे पॅनल असलेले 29 तर 3 नगरसेवकांचे पॅनल असलेले 2 अशा 31 प्रभागांची रचना करण्याचे काम सुरू केले आहे.
याला आमचा विरोध आहे असे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे म्हणणे आहे.मुंबई महापालिकेत सिंगल वॉर्ड पद्धत, तर मग केडीएमसी पॅनल पद्धत का? असा उपस्थित करत सर्व महापालिकेसाठी सारखेचं नियम ठेवा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. तर काँग्रेसने प्रभाग रचनेबाबत हरकत घेत आयुक्तांना पत्र दिले आहे.