गोवा विरुद्धच्या मोठ्या विजयात
ईश्वरी सावकार नाबाद ९१ व ऐश्वर्या वाघचे ३ बळी
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने गोवावरील विजयात आपल्या जोरदार फलंदाजीची चमक दाखवत नाबाद ९१ धावा फटकवल्या. ऐश्वर्या वाघने देखील ३ बळी घेत विजयाला मोठा हातभार लावला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे २३ वर्षांखालील महिलांसाठी टी-ट्वेंटी सामन्यांची स्पर्धा सध्या रायपूर येथे खेळवली जात आहे.
महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १ बाद १७५ धावा केल्या. त्यात ईश्वरी सावकारने केवळ ७० चेंडूत १० चौकार व ३ षटकारांसह फटकेबाज ९१ धावा केल्या. उत्तरादाखल महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी गोवा संघाला सर्वबाद ८६ पर्यंतच मजल मारून दिली. त्यात नाशिकच्या डावखुरी फिरकीपटू ऐश्वर्या वाघने सर्वाधिक ३ बळी घेतले आणि महाराष्ट्र संघाला ८९ धावांनी मोठा विजय मिळवून दिला.
या महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील महाराष्ट्राचा बाकी साखळी सामना - १२ जानेवारी - अरुणाचल प्रदेश.
ईश्वरी सावकार व ऐश्वर्या वाघचे छायाचित्र सोबत पाठवत आहे.