मंगळवारी रात्री उशिरा महाराष्ट्र शासनाने त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर , मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, या निर्णयावर तीव्र नापसंती दर्शवली. मराठी शाळांमध्ये हिंदी भाषा लादली जाणार असेल, तर याचा तीव्र विरोध करण्यात येईल. महाराष्ट्रात हिंदी भाषा लादू दिली जाणार नाही. त्रिभाषा सूत्राचा राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी काहीही संबंध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या गुजरातमध्ये जर तिसरी भाषा सक्तीची नसेल, तर महाराष्ट्रातच ती का लादली जाते?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला जर सरकारने हा निर्णय सरकारने मागे न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उभारण्यात येईल असे त्यांनी सांगितले